Ad will apear here
Next
अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी
‘तू माझी अन् तुझा मीच ही खातर ना जोवरी, प्रीतीची हूल फुकट ना तरी!’ म्हणणारे लोकप्रिय कवी आणि लेखक अनंत काणेकर आणि प्रामुख्याने विनोदी लेखन करणारे डॉ. अ. वा. वर्टी यांचा दोन डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी....
........ 
अनंत काणेकर 

दोन डिसेंबर १९०५ रोजी मुंबईत जन्मलेले अनंत आत्माराम काणेकर हे प्रख्यात लोकप्रिय कवी, लेखक आणि पत्रकार! त्यांची भाषा अतिशय रंजक, चुरचुरीत आणि खेळकर असायची. त्यांचं लेखन चौफेर होतं. त्यांनी लघुनिबंध लिहिले, लघुकथा लिहिल्या, कविता लिहिल्या, प्रवासवर्णन लिहिलं आणि नाटकंसुद्धा लिहिली. त्यांनी काही वर्षं ‘चित्रा’ मासिकाचं संपादनही केलं होतं. त्यांचा कम्युनिझमकडे ओढा होता.

‘माणूस’ सिनेमासाठी त्यांनी लिहिलेलं ‘आता कशाला उद्याची बात हे मजेशीर गाणं चांगलंच गाजलं होतं. त्यांच्या सौंदर्यदृष्टीचा प्रत्यय त्यांच्या कवितांमधून येतो. काहीशी मिश्कील अंगाने जाणारी ही प्रियकराची ‘मन की बात’ मांडणारी त्यांची कविता त्यांच्यात लपलेला खेळकर रसिक दाखवून देते -

‘तू माझी अन् तुझा मीच’ ही खातर ना जोवरी
प्रीतीची हूल फुकट ना तरी!
गालाला पडते खळी मला पाहुनी
ही नजर पाहते धरणी न्याहाळुनी
भयभीत प्रीत थरकते लीन लोचनी
ओठांची थरथरत पाकळी, बोल गडे, झडकरी
प्रीतीची हूल फुकट ना तरी!
जिवाजिवांची अभंग जडली जोड असे ही जरी
भीती मग कोणाची अंतरी?
ही गांठ भिडेची गळ्या लाविल
हिरव्याची पिवळी पाने ही होतील
प्रीतीच्या फुलांचा वास उडुनि जाइल
फसाल पुरत्या, बसाल गाळित घळघळ अश्रूझरी
प्रीतीची हूल फुकट ना तरी!

भारत सरकारतर्फे त्यांचा ‘पद्मश्री’ देऊन सत्कार करण्यात आला होता. त्यांना सोव्हिएट लँड नेहरू पुरस्कारसुद्धा मिळाला होता. 

चार मे १९८० रोजी त्यांचं निधन झालं.

(अनंत काणेकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
........................
डॉ. अनंत वामन वर्टी 

दोन डिसेंबर १९११ रोजी जळगावमध्ये जन्मलेले डॉ. वर्टी हे प्रामुख्याने विनोदी कथाकार म्हणून ओळखले जातात. एकीकडे ५००हून अधिक कथा लिहिताना त्यांनी एकांकिका आणि नाटकंसुद्धा लिहिली. आपल्याच कादंबरीवर त्यांनी लिहिलेलं ‘राणीचा बाग’ हे नाटक रंगभूमीवर खूपच गाजलं आणि त्याचे ३००हून अधिक प्रयोग झाले होते. त्यांनी काही काळ ‘अमृत’ मासिकाचं संपादन केलं होतं. त्यांना ‘इंदूर साहित्य सभा’ पुरस्कार आणि ‘सर्वोत्कृष्ट नाटककार’ पुरस्कार मिळाले होते. 

अभिनय, नवधर्म, उंदऱ्यामांजऱ्या, कठपुतळी, पसारा, आपले शरीर, साक्ष इतिहासाची अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

दोन फेब्रुवारी १९८७ रोजी त्यांचा मृत्यू झाला. 

(डॉ. वर्टी यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या या लिंकवर वाचता येतील.)




 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZZJCH
Similar Posts
मंगेश राजाध्यक्ष, सुमती पायगावकर ज्येष्ठ समीक्षक आणि खुसखुशीत लेखांसाठी प्रसिद्ध असणारे मं. वि. राजाध्यक्ष आणि बालसाहित्यकार सुमती पायगावकर यांचा सात जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे ‘माझ्या मराठी मातीचा मला जिवापाड छंद,’ असं लिहिणारे कवी विठ्ठल वाघ, आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, स्त्रियांची दुःखं, अठराविश्वे दारिद्र्य यांचं विदारक वर्णन करणारे उत्तम तुपे, ‘राघववेळ’ सारखी जबरदस्त कादंबरी लिहिणारे नामदेव कांबळे, विनोदी कथाकार राजाराम राजवाडे, ‘ए पॅसेज टू इंडिया’सारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांचा लेखक इ
विल्यम ट्रेव्हर परिणामकारक लघुकथालेखनासाठी नावाजल्या गेलेल्या विल्यम ट्रेव्हरचा २४ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय....
नेपोलिअन हिल, केशव सदाशिव रिसबूड ‘थिंक अँड ग्रो रिच’सारखं तुफान खपाचं पुस्तक लिहून लोकांना यशाचे मार्ग दाखवणारे नेपोलिअन हिल आणि ‘केसरि’ असं आपल्याच नावाच्या आद्याक्षरांच्या टोपणनावाने लेखन करणारे केशव सदाशिव रिसबूड यांचा २६ ऑक्टोबर हा जन्मदिन.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language